नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक वसाहतींत वेगाने व सकारात्मक वाढ होत आहे; पण हे करताना कारखान्यात अपघातांचे आणि त्यामुळे दिव्यांगत्व व दगावल्याच्या घटनाही समोर येत आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात सुरक्षा प्रदान करण्यासाठी यंदा ‘सुरक्षितता आणि कल्याण’ या महत्त्वाच्या थीमवर सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी ४ मार्च ते १० मार्च या कालावधीत राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. या दरम्यान महिला दिनही येत असल्याने कारखान्यात सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी कल्याणाची संस्कृती वाढविण्यासाठी सुरक्षाविषयक विविध कार्यक्रम घेतले जातात.