चाळीसगाव- कांद्याच्या भावात सातत्याने घसरण सुरूच असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. गेल्या १५ ते २० दिवसांत क्विंटलमागे जवळपास एक हजार रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या महिन्यात कांद्याची आवक कमी प्रमाणात होती, त्या वेळी दोन हजार ते दोन हजार ७०० असा भाव मिळाला होता. मात्र, एक महिनाही होत नाही, तोच भावात ५०० ते एख हजार रुपयांची घसरण झाली आहे.