भुसावळ- येथील भुसावळ ग्रामीण रुग्णालयात स्थापनेपासून अतिदक्षता विभाग (आयसीयू) केवळ कागदावर राहिला आहे. प्रत्यक्षात या विभागासाठी मनुष्यबळच नसल्याने अतिगंभीर रुग्णांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयात नेण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाइकांवर येत आहे. या रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी केली आहे. मात्र शास्त्रक्रियेचे साहित्य नसल्याने खोळंबा होत आहे. या रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करण्याची मागणी आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.