नंदुरबार- ग्रामीण भागातील खंडित वीजपुरवठा सुरळीत व्हावा, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सोमवारी (ता. ३) साडेअकराच्या सुमारास मार्केट यार्डसमोरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकले व ठिय्या आंदोलन केले. मात्र, वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.