आईमाऊलीची ज्योत निघाली भक्तांकडे..

VANI DEVI JYOT.jpg
VANI DEVI JYOT.jpg

नाशिक  : संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या सप्तशृंगीदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास (ता. २९) पासून प्रारंभ होत आहे. कसमादे व खान्देशातील भाविक सप्तशृंगी गडावरून मशालीद्वारे ज्योत आपापल्या गावी पादत्राणे न घालता घेऊन जात आहेत. यात पाचोरा, धुळे, चाळीसगाव, जळगाव, जामनेर, मालेगाव या भागातील भाविकांचे प्रमाण अधिक आहे. 

गडावरील ज्योतीला अनन्यसाधारण महत्त्व

नवरात्रोत्सवात प्रत्येक घरी घटस्थापना करून नऊ दिवस उपवास केले जातात. घटस्थापनेच्या अखंड दिव्यासाठी सप्तशृंगीदेवीच्या गडावरील ज्योतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक वर्षांपासून नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी दोन दिवस अगोदरपासून भाविक गडावरील अखंड ज्योत मशालीच्या साहाय्याने गावी घेऊन जातात. गावात तसेच सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी या ज्योतीद्वारे दिवे प्रज्वलित केले जातात. उत्तर महाराष्ट्राबरोबरच कसमादेसह नाशिक जिल्ह्यातही ही परंपरा अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. त्यांच्या भक्तीला कुठेही अडथळा येऊ नये, म्हणून इतर भाविक ठिकठिकाणी ज्योत पोचविण्यास हातभार लावतात. पाऊस असूनही भाविक न थांबता ज्योत घेऊन गावाच्या दिशेने जात आहेत. दमला की दुसरा नंतर तिसरा अशा क्रमाने ज्योत नेली जाते. 

 दुर्गामाता मंदिरात तयारी सुरू 
येथील ग्रामदैवत दुर्गामाता मंदिरातही नवरात्रोत्सवानिमित्त तयारी सुरू आहे. मंदिर परिसरात स्वच्छतेसह रोषणाई केली आहे. रोज देवीला अभिषेक, महापूजा तसेच दुर्गासप्तपदी, मंत्रपुष्पांजली, अष्टमीच्या दिवशी नवचंडीयोगसह इतरही विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com