जळगाव: गिरणा पट्ट्यातील अवर्षणग्रस्त भागातील गरज म्हणून चाळीसगाव तालुक्यात वरखेड-लोंढे प्रकल्पाला केंद्र सरकारच्या ‘बळीराजा’ योजनेने संजीवनी देऊन या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले खरे. मात्र, आठशे कोटींवर खर्च होऊनही या प्रकल्पांतर्गत तामसवाडी या हजार लोकवस्तीच्या गावचे पुनवर्सन न झाल्याने या प्रकल्पाची उपयोगिता अद्याप शून्यच आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे संभाव्य लाभार्थी शेतकरी व तामसवाडीच्या ग्रामस्थांमधूनही नाराजीचा सूर उमटत आहे.