पारोळा- येथील लवण गल्ली परिसरात जुन्या जलवाहिनीच्या गळती(लिकेज)मुळे पिण्याचे पाणी रस्त्यावर वाया जात आहे. त्यामुळे पालिकेच्या कारभाराबाबत नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे..तामसवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असून, तामसवाडी ते वीजखेडापर्यंतचा पाणीपुरवठा सुरळीत होता. मात्र, नवीन जलवाहिनीचे काम सुरू असतानाच जुन्या जलवाहिनीला गेल्या दोन-तीन दिवसांपासून लवण गल्ली परिसरात गळती लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाया जात आहे. त्याचा पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम झाला असून, काही भागांतील नागरिकांना कमी प्रमाणात पाणी मिळत आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांवरच या पाणीपुरवठा विभागाचा कारभार सुरू आहे..नियोजन नसल्याने पाणीटंचाईची झळ नागरिकांना बसत आहे. त्यातच जलवाहिनी किती ठिकाणी लिकेज आहे, यासंदर्भात ठेकेदाराला विचारले असता, असमाधानकारक उत्तर मिळत आहे. म्हणून दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे..जलवाहिनी टाकणारे ठेकेदार व पालिकेतील अधिकारी यांच्यात योग्य समन्वय नसल्याने पिण्याचे पाणी रस्त्यावर वाया जात असल्याने पालिकेच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे..पिवळसर पाणीपुरवठापारोळा शहराला १५ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असतानाही नळाद्वारे येणारे पाणी पिवळसर असल्याची तक्रार नागरिकांनी अनेकदा पालिकेकडे केली आहे. मात्र, या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होताना दिसते. पिवळसर पाण्यामुळे काही भागातील नागरिकांना अतिसाराचा त्रास झाला आहे. म्हणून याबाबत पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन जलवाहिनीची दुरुस्ती करून पिवळसर पाण्याचा प्रश्नही तातडीने सोडवावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
पारोळा- येथील लवण गल्ली परिसरात जुन्या जलवाहिनीच्या गळती(लिकेज)मुळे पिण्याचे पाणी रस्त्यावर वाया जात आहे. त्यामुळे पालिकेच्या कारभाराबाबत नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे..तामसवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असून, तामसवाडी ते वीजखेडापर्यंतचा पाणीपुरवठा सुरळीत होता. मात्र, नवीन जलवाहिनीचे काम सुरू असतानाच जुन्या जलवाहिनीला गेल्या दोन-तीन दिवसांपासून लवण गल्ली परिसरात गळती लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाया जात आहे. त्याचा पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम झाला असून, काही भागांतील नागरिकांना कमी प्रमाणात पाणी मिळत आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांवरच या पाणीपुरवठा विभागाचा कारभार सुरू आहे..नियोजन नसल्याने पाणीटंचाईची झळ नागरिकांना बसत आहे. त्यातच जलवाहिनी किती ठिकाणी लिकेज आहे, यासंदर्भात ठेकेदाराला विचारले असता, असमाधानकारक उत्तर मिळत आहे. म्हणून दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे..जलवाहिनी टाकणारे ठेकेदार व पालिकेतील अधिकारी यांच्यात योग्य समन्वय नसल्याने पिण्याचे पाणी रस्त्यावर वाया जात असल्याने पालिकेच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे..पिवळसर पाणीपुरवठापारोळा शहराला १५ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असतानाही नळाद्वारे येणारे पाणी पिवळसर असल्याची तक्रार नागरिकांनी अनेकदा पालिकेकडे केली आहे. मात्र, या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होताना दिसते. पिवळसर पाण्यामुळे काही भागातील नागरिकांना अतिसाराचा त्रास झाला आहे. म्हणून याबाबत पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन जलवाहिनीची दुरुस्ती करून पिवळसर पाण्याचा प्रश्नही तातडीने सोडवावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.