वासुदेव चव्हाण : शहापूर (ता. जामनेर)- कडक उन्हात घामाघूम झालेल्या पाहुण्या मंडळींना ताटकळत ठेवून उशिरा लग्न लावणे एक फॅशन होऊ पाहत आहे, याविषयी सर्व स्तरातून नाराजी असली तरी कोणी याबाबत पुढाकार घेत नसल्याने साडेबाराचे विवाह दोन, अडीच वाजता लागत आहेत. विवाह मुहूर्तावर लागत नसेल तर मुहूर्त का काढायचा, असा प्रश्न काही जाणकार उपस्थित करीत आहेत.