आदर्श शिक्षकांना शाळेतच पोहोचणार पुरस्कार

file photo
file photo
Updated on

नागपूर : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती ५ सप्टेंबर हा शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येतो. परंतु यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे शासनाने सोशल डिस्टन्सिंगचे निर्देश आहेत. त्यामुळे जि.प.च्यावतीने यंदा हा शिक्षक दिन सोहळा आयोजन टाळण्यात आले. शिक्षकांचा मात्र, त्याच दिवशी गुणगौरव करण्यात येणार आहे. यासाठी निवड होणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या शाळा स्तरावरच हा पुरस्कार पोहोचता करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात जि.प.च्या १५३५ वर प्राथमिक शाळा असून, येथे जवळपास ४६०० शिक्षक कार्यरत आहेत. तर माध्यमिकच्या १२ वर शाळा असून, येथेही शंभरावर शिक्षक कार्यरत आहेत. दरवर्षी शिक्षक दिनी स्वयंमूल्यमापन पद्धतीने १३ तालुक्यातून १३ प्राथमिक शिक्षक आणि जिल्ह्यातून दोन माध्यमिक शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. त्यांना मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ५०० रुपये रोख असे बक्षिस देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो. यंदा शिक्षण विभागाने २ ऑगस्टपर्यंत शिक्षकांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्यानुसार प्राथमिक गटातील केवळ ३६ तर माध्यमिक गटासाठी फक्त ३ शिक्षकांकडूनच प्रस्ताव सादर झाले आहेत. सदरचा पुरस्कार आपल्याला मिळावा यासाठी गत फेब्रुवारी महिन्यांपासूनच अनेक शिक्षकांनी पदाधिकाऱ्यांकडे लॉबिंग केली. शिक्षकांच्या कार्याची उलट तपासणीच करण्यात आली नसल्याची चर्चा आहे.

तालुक्यांतून आले शिक्षकांचे इतके प्रस्ताव
तालुका         प्राथमिक     माध्यमिक
नागपूर (ग्रा.)      ३              १
काटोल               १            १      
नरखेड              १             -
सावनेर             ४              -
पारशिवनी        ३              -
रामटेक           ३              १
मौदा              ४              -
उमरेड           ३               -
भिवापूर         ४               -
हिंगणा           ३              -
कामठी          २             -
कळमेश्वर        २           -
एकूण            ३६          ३

विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव साद
पंचायत समितीस्तरावरून गट शिक्षणाधिकाऱ्यांकडून आलेल्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येत होते. आता जि.प.मध्ये सत्तापरिवर्तन होताच व कोरोनाचा संकटकाळ असल्यामुळे यंदा या पुरस्कारासाठी विभागप्रमुखांची छाननी समिती नेमली. परंतु त्या समितीने कागदोपत्री पाहणी करून व पदाधिकाऱ्यांनी सूचनेवरून नावांना अंतिम केल्याची चर्चा आहे. ही नावांची यादी अंतिम मंजुरीकरिता विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com