समर्थकांना लागली चिंता; कोरोना वाढला तर पालकमंत्र्यांना धरणार जबाबदार!, वाचा राजकारण...

Guardian Minister Vijay Wadettiwar likely to get into trouble
Guardian Minister Vijay Wadettiwar likely to get into trouble
Updated on

नागपूर : अख्या महाराष्ट्रात जेव्हा कोरोनाने हाहाकार माजवला होता. त्यावेळी म्हणजे सुरुवातीच्या दोन महिन्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. याचे सर्व श्रेय तत्कालीन परिस्थितीत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना देण्यात आले. ज्या पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाची स्थिती हाताळली होती. त्यामुळे त्यांच्याबाबत जनभावना चांगली होती. आता त्यांची बदली करण्यात आली. जर चंद्रपुरात कोरोना वाढला तर दोष कुणाल द्यायचे? पालकमंत्र्यांना का? वाचा संपूर्ण प्रकार...

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यात कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविले होते. त्यांच्या पाठिशी जनाधारही चांगला होता. परंतु, तडकाफडकी त्यांची बदली करण्यात आली. यामध्ये पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची भूमिका महत्त्वाची होती. खेमनार स्वतः डॉक्टर असल्याचा फायदा कोरोनाच्या नियंत्रणात जिल्ह्याला झाला. त्यांच्या बदलीनंतर आता जर जिल्ह्यात कोरोना फोफावला तर त्याचे खापर वडेट्टीवारांवर तर फुटणार नाही ना? याची चिंता त्यांच्या समर्थकांना लागली आहे.

पालकमंत्र्यांनी आणखी काही काळ जरी त्यांची बदली टाळली असती तर या बदलीमध्ये जे राजकारण झाले, तेसुद्धा झाले नसते. कारण, डॉ. खेमनार यांची बदली होऊ नये म्हणून जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार या सर्वांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले होते.

वडेट्टीवारविरुद्ध जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी असे चित्र तेव्हा झाले होते. पण, या बदलीच्या राजकारणामध्ये पालकमंत्र्यांनी बाजी मारली. डॉ. खेमनार जनमानसात लोकप्रिय असल्याने जिल्हाभर त्यांच्या बदलीची चर्चा झाली. त्यामुळे आता जर का कोरोना वाढला, तर जनतेसह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी याचे खापर पालकमंत्र्यांवर फोडण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, असेच आजच्या स्थितीवरून दिसते.

बदली करण्याला विरोध नव्हताच, पण...

अधिकारी येतात आणि जातात. प्रशासनाच्या कारभारातील ती एक प्रक्रिया आहे. बदली करण्याला विरोध नव्हताच. पण, ही स्थिती थोडीफार निवळल्यावर बदली करावी, असा एक सूर उमटला आहे. त्यामुळे नवीन आलेले जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्यावर कोरोनावर नियंत्रण मिळविण्याची मोठी जबाबदारी आहे.

पक्षातील आणि पक्षाबाहेरील लोकांनी विरोध

कोरोनाच्या स्थितीत जिल्ह्याचे काम व्यवस्थित सुरू होते. त्यामुळे सध्याच त्यांना येथून हलवायला नको, अशी एक जनभावना होती. त्यामुळेच बदलीच्या विषयात पालकमंत्र्यांना त्यांच्या पक्षातील आणि पक्षाबाहेरील लोकांनी विरोध केला. पण हा विरोध डॉ. कुणाल खेमनार यांच्याबद्दल चांगली भावना आहे म्हणून नव्हे, तर त्यामागे झालेल्या ‘घडामोडीं’मुळे असल्याची चर्चा आता चंद्रपूर जिल्ह्यात रंगली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com