सरकारने परीक्षा केल्या रद्द, पण शाळा ऐकायला तयार नाहीत; नामांकित शाळांकडून परीक्षा घेणे सुरूच

most of the school taking student exam even after cancelled by government in nagpur
most of the school taking student exam even after cancelled by government in nagpur

नागपूर : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने पहिली ते अकरावी पर्यंतच्या परीक्षा न घेता पुढच्या वर्गात विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचे आदेश शाळांना दिले. मात्र, विभागाचा आदेश धुडकावून शाळांद्वारे सर्रासपणे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. 

विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता, त्यांना प्रमोट करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. कोरोनाच्या प्रकोपामुळे मंत्र्यांच्या या निर्णयाचे शिक्षक व पालकांनी स्वागत केले. हाच नियम नववी आणि अकरावीलाही लागू करण्यात आला आहे. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखवीत शहरातील काही नामांकित शाळांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे कोरोना परिस्थितीचा फायदा घेत, काही शाळांनी विद्यार्थ्यांना विविध असाईनमेंट देण्यास सुरुवात केली आहे. या प्रकाराने पालकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. 

शिक्षण विभागाकडेही तक्रार - 
शालेय शिक्षण विभागाद्वारे पहिली ते अकरावीच्या (दहावी वगळून) परीक्षा न घेण्याचे आदेश दिलेत. मात्र, ते आदेश शहरातील बऱ्याच शाळा मानत नसल्याने याबाबत काही पालकांनी शाळांविरोधात तक्रार केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता विभाग त्याबाबत शाळांवर कोणती कारवाई करते, त्याकडे लक्ष लागले आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com