नागपूर विद्यापीठाच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षांबाबत झाला हा महत्त्वाचा निर्णय

nagpur university
nagpur university

नागपूर : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ३१ मार्चपर्यंतच्या सर्व परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केला. यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 14 एप्रिलपर्यंतच्या 283 परीक्षा आणि प्रात्यक्षिक पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. यासंदर्भात शनिवारी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी परिपत्रक काढले. 

राज्यातील पुणे, मुंबई आणि नागपूर ही सर्वात मोठी विद्यापीठे आहेत. मात्र, पुणे आणि मुंबई विद्यापीठ हे केवळ अंतिम वर्षाची परीक्षा घेत असून इतर सत्रांत परीक्षा घेण्याची जबाबदारी ही संलग्नित महाविद्यालयांची आहे. मात्र, नागपूर विद्यापीठ सर्वच परीक्षा घेत असल्याने परीक्षा पुढे करण्याचा निर्णयाचा सर्वाधिक फटका नागपूर विद्यापीठाला सहन करावा लागणार आहे. नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना २७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून यामध्ये ८९९ परीक्षांचा समावेश आहे.

यावर्षी ४ लाख १६ हजार नियमित विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परीक्षेच्या पहिल्या टप्प्यामध्ये १३३ परीक्षांचा समावेश असून यातील शंभर परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. तर ३३ परीक्षा अद्याप बाकी आहेत. यासह १९ मार्चपासून १८७ परीक्षा सुरू होणार होत्या. या परीक्षेसाठी ९० हजार विद्यार्थ्याची झाली असून या सर्व अनुत्तीर्ण विद्यार्थी आहेत. मात्र, सरकारच्या निर्णयामुळे या सर्व परीक्षा समोर ढकलण्यात आल्यात. आहे.  यामध्ये बी.ए., बी.एसस्सी., एम.ए., बी.कॉम., बीबीएच्या परीक्षांचा समावेश आहे. 

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे देशभरातील विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्था बँड राहणार आहेत. यातूनच पुन्हा एकदा विद्यापीठातील तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या टप्प्यात जवळपास 283  परीक्षांचा समावेश असून जवळपास दोन लाख 10 हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या परीक्षेत बी.ए., बी.कॉम. बी.एसस्सी.सह पदवुत्तर शाखेतील नियमित विद्यार्थ्यांचा समावेश आहे . त्यामुळे पुढे  परीक्षांचे नियोजन करणे तारेवरची कसरत ठरणार आहे.


राज्यासह देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची अवस्था असल्याने परीक्षा घेणे शक्य नसल्याचे दिसते. यासंदर्भात कुलसचिव डॉ. निरज खटी यांच्याशी चर्चा केल्यावर निर्णय घेण्यात आला आहे. तसे परिपत्रक काढण्यात आले आहे. 14 एप्रिल नंतर परीक्षा घेण्याबाबत निर्णय होईल. 
- डॉ. प्रफुल्ल साबळे, संचालक,
परीक्षा व मूल्यमापन मंडळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com