नागपूर : राज्यात पाच शहरात राबविण्यात येणाऱ्या अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदाही ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यंदा ही प्रक्रिया खऱ्या अर्थाने ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. प्रक्रियेत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज आणि शुल्क ऑनलाइन पद्धतीनेच भरावयाचे असल्याचे शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
शहरातील 190 कनिष्ठ महाविद्यालयांमधील 58 हजार 240 जागांचा समावेश आहे. दरवर्षी दहावीचा निकाल जून महिन्यात लागतो. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशास जून महिन्यात सुरुवात होते. गेल्या तीन वर्षांपासून राज्यभरात अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी राज्यात सर्व शाळेतील विद्यार्थ्यांकडून अर्जाचा पहिला टप्पा भरून घेतला जातो.
निकालानंतर अर्जाचा दुसरा टप्पा भरण्यात येतो. यानंतर समितीमार्फत अकरावीच्या प्रवेशाची यादी टक्केवारीच्या आधारावर प्रकाशित करून महाविद्यालयांना जागेचे अलॉटमेंट करण्यात येते. राज्यभरात दहावीसाठी जवळपास 16 लाखांवर विद्यार्थी नोंदणी करतात. यापैकी जवळपास 75 ते 80 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होतात. राज्यभरातील दोन हजारांवर महाविद्यालयांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते.
राज्यात कोरोनाचे सावट गडद असल्याने जुलै महिन्याच्या शेवटी दहावीचा निकाल लावण्यात येईल, असे बोर्डाकडून सांगण्यात येत आहे. त्यानुसार मंगळवारी शिक्षण विभागाने अकरावीचे पाच शहरातील प्रवेश ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे ठरविले. महत्त्वाचे म्हणजे यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रांवरून माहिती पुस्तकांच्या विक्रीची मुभा न देता, विद्यार्थ्यांना ऑनलाइन माहिती पुस्तिका बघून अर्ज भरावयाचा आहे. यासाठी ऑनलाइन शुल्कच भरावे लागणार आहे. मात्र, केंद्रावर विद्यार्थ्यांना बघण्यासाठी केवळ पाच माहिती पुस्तिका ठेवण्यात येणार आहे. साधारणत: दहावीचा निकाल लागल्यावर प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
असे आहेत बदल
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.