गडचिरोली - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज (ता. ६) थेट महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कवंडे गावात पोहोचले. या अतिदुर्गम आणि नक्षलप्रभावित भागात जाणारे ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले. त्यांच्या उपस्थितीत आज कोट्यवधींचे बक्षीस असलेल्या १२ माओवाद्यांनी शस्त्रांसह शरणागती पत्करली. माओवाद्यांनी शस्त्रांसह शरणागती पत्करण्याची अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे.