मंगरुळपीर (जि.वाशीम) ः जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र संचालकांनी ५ जुलै रोजी वाशीम येथे बैठकीत कृषिसेवा केंद्रे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या बंद मुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना चागलाच त्रास सहन करावा लागत आहे. अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा नेमकेच शेतातील पिके थोडी मोठी झाली असून, त्यांना रासायनिक खते, औषधे व ईतरही कृषी मालासाठी भटकंती करावी लागत आहे. यामध्ये कृषिसेवा केंद्राचे संचालक थेट कम्पनीतून माल आणून त्याची विक्री करतात मग एकट दुखट शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे उगविले नाही तर व ज्यांच्या शेतातील बियाणे उगविले असेही सरळ कृषी विभागात तक्रारी करीत आहेत. याबाबी साठी काही वैज्ञानिक कारणेही असून प्रर्जन्यमान कमी जास्त होणे, पेरणी लवकर करणे, घरगूती बियाणे वापरणे, ट्रॅक्टर ने खोल पेरणी करणे असेही कारणे यास कारणीभूत आहेत मात्र कुठलीही शहानिशा न करता दुकानदाराच्या विरोधात तक्रारी होत असल्याने शेवटी कृषी सेवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. |
|||
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.