शिरपूर (जि.वाशीम) ः जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना बोगस बियाणे दिल्या प्रकरणी कृषी व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्या निषेधार्थ कृषीव्यावसायिकांकडून न्यायालयीन लढाई लढण्याऐवजी संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे. यामुळे मात्र ऐन खरिपात शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात येत असून, त्याबाबत शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा सर्व घटकवर्ग लॉकडाउन असताना जगाचा पोशिंदा बळीराजा मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घराबाहेर पडून अविरतपणे शेतावर राबत होता. लॉकडाउन काळामध्ये शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. भाजीपाला, फळे फेकावी लागली होती. तरीसुद्धा खरीप हंगामाची तयारी शेतकऱ्यांनी मोठ्या जोमाने केली. अनेक कंपन्यांकडून शेतकऱ्यांना बोगस बियाण्याचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या. त्यामुळे कृषी विभागाकडून काही कृषी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्या निषेधार्थ कृषी विक्रेत्यानी संपाचे हत्यार उपसून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार करण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडून शेकडो तक्रारी दाखल झाल्या असताना संथ गतीने कारवाई कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. (संपादन-विवेक मेतकर) |
|||
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.