शेंदुरजना बाजार: गेल्या आठवड्यात तापमानाचा पारा ४० अंशांवर गेल्यापासून संत्रा बागांमध्ये फळगळतीचे प्रमाण वाढल्याने बळीराजा चिंतेत आहे..तिवसा तालुक्यातील अमदाबाद-भांबोरा परिसरात अनेकांकडे संत्रा बागा आहेत. संत्र्याला समाधानकारक बहार आल्याने शेतकरी सुखावला होता..Nagpur News: शहरातील रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण; मनपाच्या दुर्लक्षामुळे वाहनचालक, नागरिक त्रस्त.पण अचानक वातावरणातील बदल आणि वाढत्या तापमानमुळे संत्रा पिकाला गळती सुरु झाली. सकाळी फुललेली कोवळी फळे दुपारच्या झळांनी पिवळी पडून गळून जातायत.पाणी दिलं तरी जमीन ताप धरते, फळाला टिकाव मिळत नाही, असे स्थानिक शेतकरी सांगतात..शेतकऱ्यांच्या मते ५० टक्के पेक्षा अधिक उत्पन्नावर परिणाम होणार आहे. त्यातच अचानक जोरदार वादळ वारा आणि अकाली तुरळक पावसाने सुद्धा नुकसानात भर घातली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत..Premium|Lakshya Sen Badminton : थकव्याने घात केला; ऑल इंग्लंडच्या रंगतदार अंतिम लढतीत लक्ष्य सेनचा लिन चुन-यीसमोर थोडक्यात पराभव.नुकसान वाढण्याची शक्यतागेल्या हंगामात भाव कमी, यंदा उत्पादन कमी. तोटा भरून काढणं कठीण झाले आहे. तापमान अजून वाढल्यास नुकसान वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत अमदाबाद येथील शेतकरी विनोद गावंडे, राजेंद्र गावंडे, प्रशांत गावंडे तसेच भांबोरा येथील भालचंद्र पोल्हाड आदी शेतकऱ्यांनी व्यक्त केले. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.