

Amravati
esakal
अमरावती: यंदाच्या खरीप हंगामात पेरणी केलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून समोर आली आहे. तिवसा, वरुड, मोर्शी, भातकुली, वलगाव आणि धामणगावरेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांनी या तक्रारी केल्या. त्यामुळे उत्पादक कंपनीविरुद्ध शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली असल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करून कारवाईची मागणी युवा स्वाभिमान पक्षाने विभागीय सहसंचालकांकडे निवेदन देत केली आहे.