

Amravati
esakal
अमरावती: सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विशेषतः चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्या अनुषंगाने पाणीटंचाई निवारणाच्या कामांना गती देण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. विशेष म्हणजे मेळघाटातील पाणीटंचाई संदर्भात ‘सकाळ’ने सातत्याने पाठपुरावा केला आहे.