गावरान कांद्याची आवक थांबली; भाज्यांचे भाव वधारले

file photo
file photo

अमरावती : कांदा चांगलाच महागणार असल्याचे संकेत आहेत. येथील बाजार समितीत उन्हाळी कांद्याची आवक पूर्णतः बंद झाली असून नाशिकचा कांदा 2800 रुपये क्विंटलवर पोहोचला आहे. भाजीपाल्याचेही दर कडाडत असून पालकाने 3500 रुपयांचा टप्पा पार केला आहे. फूलकोबी व गवार या सद्य:स्थितीत सर्वाधिक महागड्या भाज्या आहेत.
यंदा अमरावती विभागात उन्हाळी कांद्याचे उत्पादन तुलनेने कमी झाले आहे. परराज्यातून व जिल्ह्यातून या कांद्याची आवक होत होती, ती गेल्या सप्ताहापासून कमी होत आता बंदच झाली आहे. त्यामुळे गावरानी म्हणून ओळखला जाणारा कांदा बाजार समितीतून गायब झाला आहे. काही दुकानदारांकडे तो असला तरी त्याचे भाव कडाडले आहेत. जास्तीत जास्त दहा रुपये किलो भाव असलेला उन्हाळी कांदा चाळीस रुपयांवर पोहोचला आहे. शेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा पावसामुळे खराब होण्याच्या स्थितीत आल्याने त्यांनी नुकसान टाळण्यासाठी तो गेल्या पंधरवड्यात बाजारात आणला. तोच आता बाजारात उपलब्ध आहे. गेल्या सप्ताहात 3300 रुपये भाव असलेल्या कांद्याचे दर तीनशे रुपयांनी वधारले. नाशिकच्या कांद्याची आवक मात्र सुरू आहे. त्याला थोक बाजारात 2800 रुपये भाव आहे.
भाजीपालाही बऱ्यापैकी महागला आहे. शेतकऱ्यांना याचा किती लाभ मिळतो हा प्रश्‍न आहे. सर्व हंगामात स्वस्त असणाऱ्या पालकनेही यावेळी चांगला भाव खाल्ला आहे. 3500 रुपये क्विंटल भाव रविवारी (ता.8) येथील बाजार समितीत मिळाला. फूलकोबी व गवार या हंगामातील सर्वातम महागड्या भाज्या ठरल्या आहेत. आगमनापासूनच या भाज्यांचे भाव वधारलेले आहेत. फूलकोबीला 4 हजार, तर गवाराला 3500 रुपये क्विंटल भाव कायम आहे. दोन्ही भाज्यांची आवक मात्र जेमतेम आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com