

Vidarbha News
esakal
आसेगावपूर्णा: आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात पेट्रोल व घरगुती गॅससिलिंडरचा तुटवडा जाणवत असून त्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसत आहे. आसेगावपूर्णा सारख्या मोठ्या लोकवस्तीच्या गावात गॅस एजन्सी नसल्यामुळे नागरिकांना सिलिंडरसाठी शहरी भागात जावे लागत आहे. तथापि, आसेगावपूर्णा येथे गॅस एजन्सी दिल्यास १० ते १५ गावांतील नागरिकांना सोयीचे होऊ शकते, अशी चर्चा नागरिकांत आहे.