Bachchu Kadu Protest: शेतकरी कर्जमाफीसाठी १५ दिवसाच्या आत उच्चस्तरीय समिती; अखेर बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन मागे

Bachchu Kadu Hunger Strike for Farmers Ends: शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधन वाढीसाठी १५ दिवसांत समिती स्थापन होणार, उदय सामंत यांची घोषणा.
bachuchu kadu
bachuchu kaduesakal
Updated on

महाराष्ट्रातील शेतकरी आणि दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी १५ दिवसांच्या आत उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा केली आहे, तर दिव्यांगांच्या मानधन वाढीसंदर्भात ३० जून रोजी बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती देताना सरकार शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. या घोषणेनंतर बच्चू कडू यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com