संपूर्ण गावाने कष्टाने फुलवली देखणी फुलबाग, मात्र आता...

nagbhid flower crop
nagbhid flower crop

नागभीड(चंद्रपूर) : कोरोनामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. नागभीड तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांनी फुलांची शेती केली. पीक हाताशी आले असताना अचानक लॉकडाउन करण्यात आल्याने त्यांच्या शेतातील संपूर्ण फुले सुकू लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. सरकारने त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. 

सगळ्या जगात कोरोना विषाणूमुळे हाहाकार माजवला आहे. संपूर्ण जग लॉकडाउन झाले असून जगात मंदीची लाट धुमसत आहे. अशातच अनेकांचे छोटेमोठे उद्योगधंदे लयास जाणे सुरू झाले आहे. अनेकांचे शेतीतील तोंडाशी आलेले पीक शेतातच सडत आहे. काहींना ट्रॅक्‍टर फिरवावा लागत आहे तर काहींना शेतात गुरे ढोरे सोडावी लागत आहेत. 

अशातच नागभीड येथील अभियांत्रिकेचे शिक्षण घेतलेल्या मनीष बाळकृष्ण करकाडे या युवा शेतकऱ्याने आपल्या शेतीत एक नवीन प्रयोग म्हणून येथील कृषी अधिकारी श्रीमती रामटेके यांच्याकडून मार्गदर्शन घेत आपल्या शेतात एकरांमध्ये गलांडा या प्रजातीच्या फुलझाडांची अतिशय मेहनत करून सेंद्रिय खताचा वापर करून लागवड केली आणि त्याचा प्रयोग यशस्वी ही ठरला. अत्यंत देखणी फुलबाग तयार झाली आणि फुल लागायला सुरुवात झाली आणि मनीष ला त्याचा अत्यानंद झाला. 

बाजारपेठच नसल्याने फुलशेतीवर संक्रांत 
स्वत: उच्च शिक्षित असल्याने त्याने स्वतः शेतीत केलेल्या या नव्या प्रयोगाच्या यशस्वीतेने त्याला शेतीत आणखी नवे प्रयोग करण्यास तो सज्ज झाला आणि आता 5 ते 6 दिवसात फुलांचा पहिला तोडा बाजार पेठेत पाठवून आपल्या कष्टाच्या घामाने फुलवलेल्या या फुलबागेतील फुले आपल्याला आर्थिकदृष्टया संपन्न बनवतील ही स्वप्ने तो पाहू लागला. पण अशातच कोरोना या विषाणू ने संक्रमण केले.

आणि सर्व जगात हाहाकार माजला आणि भारत सरकारने एकवीस दिवसाचा लॉकडाउन केल्याने संपूर्ण बाजार पेठ बंद झाली. तोंडाशी आलेले फुले आज शेतातच तोडून टाकावी लागत आहेत. या सगळ्या परिस्थितीत या फुलबागेसाठी लावलेला पैसा आणि मेहनत वाया गेल्याने हा युवा शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र याही परिस्थिती मध्ये देशावर आलेले संकट हे फार मोठे असून त्यासाठी ही परिस्थिती 
निर्माण झाल्याने लवकरच देश कोरोना मुक्त होईल आणि पुन्हा नव्या जोमाने शेतीत नवनवे प्रयोग करणार असल्याचे मनीषने सांगितले. 

एप्रिल, मे महिन्यात लग्नसराई असते आणि त्यात फुलांची मागणी जास्त असते. त्यामुळे हे सर्व लक्षात घेता या फुलांची लागवड केली होती. मात्र कोरोनामुळे केलेली मेहनत व पैसा वाया गेल्याने त्याचे एक शेतकरी म्हणून दुःख होत आहे. 
- मनीष करकाडे, शेतकरी, नागभीड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com