

Wasim News
esakal
मंगरूळपीर: पश्चिम विदर्भातील वाशीम जिल्हा हा कमी पर्जन्यमानामुळे ओळखला जातो. अपुऱ्या पावसामुळे आणि सिंचनाच्या मर्यादित सुविधांमुळे येथील बहुतांश शेती कोरडवाहू आहे. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीत मंगरूळपीर तालुक्यातील अतिदुर्गम बोरव्हा गावातील प्रगतशील शेतकरी अमोल भुसारे यांनी जिद्द, नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीत उल्लेखनीय यश मिळवले आहे.