

Devendra Fadnavis Inaugurated Bridge Collapses After Three Years Heavy Rain Washes Away Major Section
sakal
एटापल्ली (जि. गडचिरोली) : एटापल्ली तालुक्यासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मागील आठवडाभर झालेल्या अतिमुसळधार पावसाने मोठे नुकसान केले आहे. या पावसामुळे पिपली बुर्गी परिसरातील महाराष्ट्र-छत्तीसगडला जोडणारा महत्त्वाचा कोठी-कोरनार पूल पुराच्या प्रचंड तडाख्याने मधोमध खचला असून पुलाचा मोठा भाग वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.