
बुलडाणा, ता. २ – राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे जिवंत उदाहरण म्हणजे गुन्हेगारांविरोधात न्याय मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यालाच पोलीस ठाण्यात ठिय्या द्यावा लागत आहे, असे खोचक मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले. त्यांनी राज्याला पूर्णवेळ स्वतंत्र गृहमंत्री असण्याची गरज असल्याचे ठामपणे सांगितले.