

Gadchiroli
esakal
गडचिरोली: मागील पाच वर्षांपासून रखडलेला आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग पावसाळ्यात अधिकच भयावह आणि वाहनचालकांसाठी जीवघेणा झाला आहे. त्यामुळे या महामार्गावरील अवजड वाहतूक तत्काळ बंद करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केल्यानंतर दैनिक सकाळने मंगळवारी (ता. ७) वृत्त प्रकाशित करत ही समस्या ऐरणीवर आणली. दैनिक सकाळच्या वृत्ताची तत्काळ दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या महामार्गावरील जड वाहतूक ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.