

Chandrapur
esakal
चंद्रपूर: खरीप हंगामाच्या तोंडावर बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात एकूण बियाणे मागणी ६१६१९ क्विंटल निश्चित करण्यात आली आहे. रासायनिक खतांचे एप्रिल २०२६ अखेरपर्यंत एक लाख ८० हजार ८०० मेट्रिक टन आवंटन मंजूर आहे. त्यापैकी एक लाख एक हजार ९०९ मेट्रिक टन साठा प्राप्त झाला आहे. त्यातील ४६ हजार ९७४ मेट्रिक टन खताची विक्री झाली आहे.