

Chandrapur
esakal
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ११४० मिमी आहे. मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, मार्च महिन्यापासून सूर्यनारायण आग ओकू लागल्याने पाण्याचे स्त्रोत आटत असल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. शहरातील अनेक भागांत एक दिवसाआड टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मे महिन्यात आणखी भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते.