

Chhatrapati Shivaji Maharaj
sakal
आरती दलाल-धारकर
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून इतिहास घडवला. त्यांच्या कार्याचे आणि राज्यव्यवस्थेचे पोवाडे आजही गायले जातात. पण शिवाजी महाराज विदर्भात आले की नाही, हा एक विषय होता. इतिहासकार प्रा. डॉ. किशोर वानखेडे यांनी दिलेल्या संदर्भानुसार विदर्भाच्या भूमीलाही शिवरायाचे पाय लागले. किमान सहा वेळा तरी ते वेगवेगळ्या कारणांनी विदर्भात आले असल्याचे संदर्भ आहेत.