Yavatmal News : निकृष्ट सोयाबीन बियाण्यांवर जिल्हाधिकार्‍यांचा दणका! तीन हजार तक्रारींनी उडाली खळबळ, 15 परवाने रद्द करण्याची शिफारस

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे हजारो शेतकर्‍यांचे नुकसान झाल्याचे चित्र समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे.
Soybean

Soybean

sakal
Updated on

यवतमाळ - निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे हजारो शेतकर्‍यांचे नुकसान झाल्याचे चित्र समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. जिल्हाभरातून तीन हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या असून 2 हजार 962 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाची उगवण न झाल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात संबंधित कंपन्यांविरुद्ध विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून दोषी कंपन्यांना वाचविले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com