कोरोनामुळे या व्यवसायावर आली अवकळा... 

Corona has caused a rift in the printing press business
Corona has caused a rift in the printing press business

राजुरा (जि. चंद्रपूर : कोरोनामुळे यंदा सामाजिक चित्र पूर्णत: बदलले आहे. लाकडाऊनमुळे लग्नसोहळ्यांवर बंधने आली. अनेक कार्यक्रम स्थगित झाले. संकटकाळात लग्नसोहळा करताना शासनाने अटी व शर्थी लादल्या आहेत. लग्न सोहळ्यात पाहुण्यांची संख्या मर्यादित केली आहे. यामुळे आप्तेष्ट व मित्रमंडळींना फोनद्वारे निमंत्रण दिले जात आहे. कालौघात लग्न पत्रिकेद्वारे निमंत्रणाची जागा आता समाजमाध्यमाने घेतली. त्यामुळे प्रिंटिंग व्यवसायावर अवकळा आली आहे. 

फेब्रुवारी ते मे महिना साधारण लग्नसराईचा असतो. या काळात गावगाड्यातील लग्न समारंभ आटोपले जातात. शहरातील मंगल कार्यालय फुल्ल असतात. लग्नसमारंभाच्या एक ते दीड महिन्यापूर्वी आप्तेष्ट, मित्रमंडळींना निमंत्रण पत्रिका वाटपात वर, वधूकडील मंडळी कामात मग्न असत. तीन महिन्यांच्या कालखंडात शहरातील प्रिंटिंग व्यवसाय तेजीत असतो. नातेवाईकांना निमंत्रण देण्यासाठी वधू,वराकडील मंडळी आपल्या परिस्थितीनुरूप लग्नपत्रिकांची निवड करीत असते तसेच कमीत कमी पाचशे लग्नपत्रिकांची छपाई सामान्य कुटुंबातील मंडळी करतात. आपल्या आर्थिक परिस्थितीनुरूप पत्रिका निवडली जाते. अलीकडे आधुनिक तंत्रज्ञानामुळे डिजिटल मल्टीकलर लग्नपत्रिकेची धूम होती. लग्नपत्रिकेच्या माध्यमातून समाजजागृती व संदेश देण्याचे प्रकार आजच्या पिढीमध्ये बघायला मिळत होते. मात्र, कोरोना संकटाने प्रिंटिंग व्यवसाय उद्‌ध्वस्त केलेला आहे. वर्षभरातील सर्वाधिक व्यस्त असणारे तीन महिने आता खाली गेलेली आहे. दररोज आठ ते दहा हजार लग्नपत्रिका सफाई होणारे व्यवसाय पूर्ण टप्पा आहे. शिवाय अगदी कमी पाहुण्यांमध्ये लग्न समारंभ करायचा असल्यामुळे पत्रिका छापणे बंद झाले. पाहुण्यांना, आप्तेष्टांना फोनद्वारे निमंत्रण किंवा संदेश देऊन कौटुंबिक कार्यक्रम होत आहेत. त्यामुळे प्रिंटिंग व्यवसाय डबघाईस आलेला आहे. लाखोंची उलाढाल होणाऱ्या या व्यवसायात सर्वाधिक फटका बसला असल्याचे व्यवसायिकांनी सांगितले. लग्नसमारंभासोबत इतर कार्यक्रमांसाठी निमंत्रण पत्रिका छापल्या जायच्या. परंतु कोरोना संकटाने सामाजिक जीवनशैली बदलली आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी घरगुती कार्यक्रम आयोजित करण्यावर नागरिकांचा भर आहे. अशा स्थितीत प्रिंटिंग व्यवसायासमोर मोठे आर्थिक संकट उभे आहे. प्रिंटिंग व्यवसाय सध्या ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहे. 

प्रचंड नुकसान 
आमचे साधारण तीन महिने वर्षातील सर्वात कामाचे असतात. दररोज साधारण आठ ते दहा हजार लग्नपत्रिका छापल्या जातात. मात्र, यंदा कोरोना संकटामुळे सर्व व्यवसाय ठप्प आहेत. पाहुण्यांची मर्यादा व गर्दी टाळण्यासाठी शासनाच्या नियमानुसार कार्यक्रम होत आहेत. त्यामुळे लग्नपत्रिकांद्वारे निमंत्रण देण्याची प्रथा बदललेली आहे. फोनद्वारे त्यांना नातेवाईकांना निमंत्रण देण्यात येत आहे. त्यामुळे प्रिंटिंग व्यवसायाचे प्रचंड नुकसान झाले आहे. 
अमोल नवले, संचालक, स्वरांजली प्रिंटिंग, राजुरा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com