महात्मा गांधींच्या विचाराची देशाला गरज

The country needs the thought of Mahatma Gandhi
The country needs the thought of Mahatma Gandhi
Updated on

बुलडाणा : सध्या देशाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. देशाची अखंडता, एकता आणि संविधानाला धोका पोचविण्याचे काम होत आहे. विविधते मध्ये एकता हाच भारतीय राज्यघटनेचा खरा आत्मा आहे. धर्माच्या आधारावर भारतीयांना विभाजित करुन लोकशाही खिळखिळी करुन देशातील एकोपा नष्ट करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी संपूर्ण जगाला अंहिसेचा मार्ग दाखविणारे महात्मा गांधी यांच्या विचारांची देशाला गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केले.

हम लाये है तुफानसे कश्‍ती निकालके, इस देश को रखना मेरे बच्चो संभालके... अशा देशभक्तिपर वातावरणात सध्याच्या गंभीर परिस्थितीतून देशाला वाचविण्याचा संदेश देण्यासह व्यर्थ न जाये बलिदान चा नारा देत जिल्हा कॉग्रेसच्या वतीने आज (ता.30) जिल्हा मुख्यालयी एकात्मता रॅली काढण्यात आली. यावेळी ते प्रास्ताविक करत होते. या एकता रॅलीनंतर गर्दे सभागृहात एकता संमेलन पार पडले. देशाची एकता टिकविण्यासाठी गांधी विचारांची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत शहरातून एकता रॅली काढण्यात आली. स्थानिक गांधी भवनातून या एकता रॅलीला सुरुवात झाली. देशभक्तिपर गीते आणि महात्मा गांधी यांचे भजने वाजवीत एकता आणि देशाच्या अखंडतेचा संदेश देत ही रॅली मुख्य बाजारपेठ, कारंजा चौक मार्गे फिरून ही रॅली गर्दे सभागृहात पोचली. त्यानंतर तेथे एकता संमेलन पार पडले. प्रारंभ महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव हर्षवर्धन सपकाळ यांचे 'गांधी हत्या कुणी आणि का केली' या विषयावर व्याख्यान पार पडले. या कार्यक्रमाला यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस मागासवर्गीय सेल चे प्रदेश अध्यक्ष विजय अंभोरे, माजी आमदार बाबूराव पाटील, मुखत्यासिंग राजपूत, लक्ष्मणराव घुमरे, जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा नितीन पवार, महिला व बालकल्याण सभापती ज्योती अशोक पडघानआदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

रथ ठरला लक्षवेधी

फुगे, हार आणि कॉंग्रेस पक्षाच्या ध्वजाने सजविलेल्या रथामध्ये सर्व धर्म आणि पंथातील वेशभूषा परिधान केलेल्या चिमुकल्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी ही रॅली बुलडाणेकरांचे लक्षवेधी ठरली. यावेळी हम सब एक सह विविध नारेही देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com