धनगर समाजाला गृहित धरू नये

नागपूर : आपल्या विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करताना धनगर समाजाचे पदाधिकारी.
नागपूर : आपल्या विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करताना धनगर समाजाचे पदाधिकारी.

नागपूर : भाजप सरकार आरक्षण देईल, या अपेक्षाने संपूर्ण धनगर समाज मागील विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या पाठीशी उभा होता. मात्र, पाच वर्षांत धनगर आरक्षणाचे भिजत घोंगडे सरकारला सोडवता आले नसल्याने आम्हाला आत गृहित धरू नये, असा इशारा आंदोलनकर्त्या कल्याणी वाघमोडे यांनी दिला.
आघाडी सरकारच्या काळातही फक्त मतांच्या राजकारणासाठी धनगर समाजाच्या आरक्षणाचा वापर करण्यात आला. त्यानंतर केंद्रात आणि राज्यातही भाजपची सत्ता आली. आघाडी टाळाटाळ करीत असल्याने समाजाने भाजपला जवळ केले होते. मात्र गेली पाच वर्षे फक्त आश्वासनं ऐकत आहेत. धनगर आरक्षणासंदर्भात टाटा इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षण अहवालांवरून आणि राज्य सरकारने म्हणावे तसे सकारात्मक पाऊल न उचलल्याने विरोधक व सत्ताधाऱ्यांच्या गोंधळामुळे विधान परिषदेचे कामकाज अनेकदा बंद पडले. विद्यमान सरकारचे धनगर समाजाकडे दुर्लक्ष आहे. आरक्षणाच्या बदल्यात एक हजार कोटीच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली. पण ती मान्य नसून घटनेप्रमाणे अनुसूचित जमातीचे आरक्षणाची मागणी असल्याचे वाघमोडे म्हणाल्या. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र लागू केले नाही तर धनगर समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही धनगर समाजबांधवांनी आजच्या ठिय्या आंदोलनातून दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com