अमरावती जिल्ह्यातील ७३१ गावे अद्याप वाऱ्यावर

Drought
Drought
Updated on

अमरावती - खरिपात दुष्काळ जाहीर झालेल्या जिल्ह्याच्या पाच तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना देय मदतीचा दुसरा टप्पा वाटून होण्यापूर्वीच तिसऱ्या टप्प्याचा मदतनिधी धडकला आहे. मात्र दुष्काळ जाहीर झालेल्या १६ महसूल मंडळ आणि ५० पेक्षा कमी पैसेवारीची एकूण ७३१ गावे अद्याप मदतीपासून वंचित आहेत.

सरकारने राज्यात एनडीआरएफच्या निकषानुसार १५१ तालुक्‍यांत दुष्काळ घोषित केला. बाधित शेतकऱ्यांना मदत व त्यापाठोपाठ महसुली मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केला. घोषित दुष्काळी तालुक्‍यांमध्ये एकूण ७,१०३ कोटी ७९ लाखांचा निधी देय होता. राज्य सरकारने १५१ तालुक्‍यासाठी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात एकूण २,९०९ कोटी ५१ लाख ९ हजार ३६० रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. पैकी दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू असतानाच आता राज्य सरकारने आकस्मिक निधीतून २ हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले. त्यातून अमरावती विभागाला ३२६ कोटी व अमरावती जिल्ह्यास ७५ कोटी ९१ लाख रुपये मिळाले. या तिसऱ्या टप्प्याच्या मदतीचे वाटप यथावकाश होत आहे. मात्र या मदतीच्या आदेशामध्ये १५१ तालुक्‍यांशिवाय ज्या महसुली मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला, त्या गावांच्या मदतनिधीचा उल्लेख नाही.

एकट्या अमरावती जिल्ह्यात दुष्काळी ५ तालुके वगळता १६ महसुली मंडळांतील ३१९ तसेच ५० पेक्षा कमी पैसेवारीच्या अशा एकूण ७३१ गावांना अद्याप कोणतीच मदत सरकारकडून देण्यात आलेली नाही. जिल्ह्यात एकूण १९६४ गावे असून दुष्काळ जाहीर झालेल्या पाच तालुक्‍यांतील गावांची संख्या ७५७ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com