
विझोरा : शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या विझोरासह परिसरातील रस्त्याची जड वाहतुकीमुळे चाळणी झाली आहे. अनेकवेळा जिल्हाधिकरी, तहसीलदार व लोकप्रतिनिधीकडे निवेदनाच्या माध्यमातून रस्त्याची दुरुस्ती व जड वाहनाची बंदी करण्याबाबत मागणी केली. परंतु, त्याचा कुठलाच फायदा झाला नसल्याने, दिवसेंनदिवस रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे कधीही मोठा अपघात होणाची शक्यता नाकारता येत नाही.
हेही पहा - तरुणाई गुन्हेगारिच्या विळख्यात
कुंभारी व विझाेरा या दोन गावाच्या व येवता गावाला लागुन असलेल्या खदानमधून मुरूम, गिट्टीची क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात नियमित वाहतूक होत आहे. त्याचप्रमाणे सराव, गोरव्हा येथेही गौणखनिज उत्खनन होते. त्याशिवाय स्टोन क्रेशर, डांबर प्लांट आहेत. त्यामुळे जवळपास शेकडो जड वाहनाची ये-जा चालू राहते म्हणून रस्त्यावर मोठमोठ खड्डे पडले आहेत. त्यामुळे चारचाकी किंवा दुचाकीने प्रवास करणे कठीण झाले आहे. ऑटोने प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत घेऊन जाने होय. रसत्याने अनेक वेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
शिवणी, येवता, शिवर व परिसरातील गावामधून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी कुंभारी गावात जातात आणि त्याच रस्त्याने मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत असल्याने अनेकवेळा छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाहतूक अन्य मार्गाने व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांनी केली आहे. परंतु, त्यांच्या मागणीकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. जोपर्यंत काही मोठा अपघात होत नाही तोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांचे डोळे उघडणार नाहीत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवीतालाही धोका निर्माण झाला आहे. काही दिवसापूर्वी मूर्तिजापूर उपविभागीय अधिकाऱ्यांनी क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई केली हाेती. परंतु, काही दिवस हाेत नाही तोच पुन्हा वाहतुकीचे प्रमाण वाढल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे अशा वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी या मार्गावर नियमीत अधिकाऱ्यांची तपासणी माेहीम राबविण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. मागण्या पूर्ण न झाल्यास चक्का जाम आंदाेलन करण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.
येथे क्लिक करा - अरेरे...कांदा लागवडीचाही होणार वांदा!
निवेदन दिल्यावरही कार्यवाही नाही
विझाेरा येथील नागरिकांनी यापूर्वी जिल्हाधिकारी, तहसीलदारांकडे अनेक वेळा निवेदन दिले हाेते. परंतु, त्यांच्याकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे जोपर्यंत काही मोठा अपघात होत नाही तोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना जाग येत नाही का? असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे.
अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी
विझाेरा रस्त्यावर नियमित क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या जड वाहनाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुले रस्त्याची दुरवस्था झाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिक सुभाष गवई यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.