
तिवसा (जि. अमरावती) : कोरोनामुळे कंपन्या बंद झाल्याने जालना येथील एका कंपनीत काम करणारे 11 युवक आपल्या गावी गोंदिया येथे पायदळ जात होते. अशात त्यांना तिवसा येथे अडवून जिल्हा परिषद शाळेत ठेवण्यात आले होते. मात्र बुधवारी (ता.15) रात्री 9.40 च्या सुमारास या ठिकाणी एक पोलिस कर्मचारी तैनात असूनही खोलीतून कवेलू फोडून यातील सात युवक चकमा देऊन पळाल्याची धक्कादायक घटना घडली.
अवश्य वाचा - दारूची तहान भागवताहेत गांजावर; व्यवसानासाठी काहीही
जालना येथून 11 युवक पायदळ नागपूरच्या दिशेने आपल्या गावी गोंदियाला जात होते. मात्र 14 एप्रिल रोजी त्यांना तिवसा प्रशासनाने पकडून येथील जिल्हा परिषद शाळेत ठेवण्यात आले होते, तर याठिकाणी त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्थासुद्धा करण्यात आली होती. मात्र रात्री 7 युवकांनी छतावरील कवेलू फोडून वर प्रवेश केला व पळ काढला, त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. मात्र जिल्हा व राज्य बंदी असूनही या युवकांनी कसा काय प्रवास केला याबाबत तपास सुरू आहे.
या युवकांना एका प्रशासकीय अधिकाऱ्याने तुम्हाला सोडण्यात येईल, तुम्ही गाडी बोलावून घ्या असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी आदल्या दिवशी गाडी बोलावून घेतली, मात्र अचानक त्यांना जाऊ दिले नाही. त्यामुळे या युवकांनी रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना चकमा दिल्याचे सांगण्यात येते.
पळून गेलेली मुले शेल्टर होममध्ये नव्हते, एका वाहनात पाचपेक्षा अधिक लोकांना जाता येत नाही. त्यामुळे त्यांना तात्पुरते त्याठिकाणी ठेवण्यात आले होते. त्यांना परवानगी मिळाल्यानंतर आम्ही सोडले असते, मात्र ते न सांगताच निघून गेले.
- वैभव फरतारे, तहसीलदार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.