स्वप्न पाहण्याचाही अधिकार हिरावला : गणेश देवी

File photo
File photo

नागपूर : निवडणूक आयोगासह संविधानानुसार स्थापन झालेल्या लोकपाल, यूजीसी, आरबीआय आणि यूपीएससी या संस्थेच्या स्वायत्तेवर सरकारने निर्बंध आणले आहेत. एका दिवसात 370 कलम रद्द केले. सर्वसामान्यांचा स्वप्ने पाहण्याचा अधिकारही सरकारने हिरावला असल्याची टीका ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री गणेश देवी यांनी सरकारवर केली. यावेळी लोकशाही, समानता, विचार आणि विविधता हे चारही शब्द अडगळीत जाण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
ऑल इंडिया बॅंक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या अधिवेशनाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. देवी म्हणाले, भाषा समाजाचे अंग आहे. तेसुद्धा हे एक चलनच आहे. पंतप्रधान याच भाषेचा वापर करून मोठमोठी स्वप्ने दाखवीत आहेत. हे आपल्याच देशात नव्हे तर इजिप्त, स्पेन, इटली आदी देशातही होत आहे. इटलीतील सर्वात जुने शहर मिलानमध्ये काही नागरिकांनी मुसोलिनीला मारले होते. तीच कृती आताही मिलानमध्ये करण्यात आली. त्याच धर्तीवर भारतातही महात्मा गांधींच्या छायाचित्रावर हल्ला करून पुन्हा हत्या करण्याचा प्रयत्न होत आहे, हे दुर्दैवी आहे. जागतिकीकरणामुळे पर्याय समोर येतील असे वाटले होते, तसे झाले नाही उलट स्थानिक खाद्यपदार्थ गायब होऊन विदेशी खाद्य पदार्थाची श्रेणी आल्याचे त्यांनी सांगितले. दहावी अनुत्तीर्ण असलेल्यांना केंद्रीय मानव संसाधन मंत्री केले होते. पदवीधर व्यक्ती संशोधनावर चर्चा करतो हे गंभीर आहे. त्यामुळेच विज्ञानातील संशोधन पूर्णपणे बंद झाल्याचेही त्यांनी सांगितले. शाळेतील इतिहासही चुकीच्या पद्धतीने शिकविण्यात येत आहे. सर्वसामान्यांची मुले शिकूच नये हाच त्याचा डाव असल्याचे सांगून तो हाणून पाडला पाहिजे, असे आवाहनही देवी यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com