

Yavatmal Farmer Tragedy
esakal
राळेगाव (जि. यवतमाळ): सरकारच्या ‘फसव्या कर्जमाफी’च्या आश्वासनाने पुन्हा एकदा जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त केला आहे. मध्यवर्ती बँक राळेगाव येथे लागलेल्या कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याच्या नैराश्यातून तालुक्यातील भांब येथील शेतकरी राजू बापूराव चुड्डुके (वय ४९) यांनी शनिवारी (ता.२५) रात्री विष प्राशन करून जीवन संपविले.