

Wardha News
sakal
वर्धा : कर्जबाजारीपणामुळे मानसिक तणावात सापडलेल्या एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना वर्धा जिल्ह्यातील वडगाव खुर्द शिवारात घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हरिदास भाऊराव मुडे (वय ५०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.