अमरावती : संत्र्याला अतिशय कमी भाव मिळत असल्याने शेतकरी चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यामुळे मोर्शी व वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.14) जिल्हाधिकारी कार्यालयामोर नागरिकांना फुकटात संत्र्यांचे वाटप केले.
माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. डॉ. बोंडे यांनी सांगितले, की जिल्ह्यात संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करण्यात येते. परंतु, यावर्षी अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु, तरीसुद्धा संत्रा उत्पादकांना शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत करण्यात आली नाही. परिणामी, शेतकऱ्यांना मोठ्या अचडणींना सामोरे जावे लागत आहे, असा आरोप डॉ. बोंडे यांनी केला.
शेतकरी संकटात असताना महाविकास आघाडी सरकार मात्र राजकारण करण्यात दंग आहे, असा आरोपही त्यांनी केला. शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तत्पूर्वी भाजपचे शहराध्यक्ष किरण पातूरकर, ललित समदूरकर, मिलींद बाबल, राजेश आखेगावकर आदींसह कार्यकर्त्यांनी जिल्हाकचेरीसमोरील रस्त्यावरून जाणाऱ्या ऑटोरिक्षा, एसटी बसेस तसेच पादचाऱ्यांना मोफत संत्री वाटली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.