
जलालखेडा (ता.नरखेड) : रोहिणी नक्षत्र संपत आले असून अधूनमधून नरखेड तालुक्यात पाऊस पडला. मृग नक्षत्रात पाऊस येईल, पण खंड राहिल असा अंदाज आहे. पण, नेमका पेरणीचा पोषक काळ मृग नक्षत्र असल्याने खरीप हंगामाची पेरणी झाली नाही तर शेतकऱ्यांचे गणित बिघडण्याचा धोका शेतकरी व्यक्त करीत असला तरी शेतकरी एकदा पुन्हा धोका पत्करत पेरणीची धावपळ सुरू केली आहे. कापूस व तूर पिकाचे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ दिसून येत आहे.