दर्यापूर - तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) अंतर्गत कापूस खरेदी होऊनही ३१ जानेवारीपासून शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत..शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे वेळेत मिळावेत, यासाठी दि. दर्यापूर तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री समितीचे विद्यमान संचालक प्रा. डॉ. सुशील गावंडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र, अद्याप कोणताच ठोस निर्णय झालेला नाही. .शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकवलेला कापूस विकला, पण त्यांना पैसे मिळत नाहीत, ही शोकांतिका आहे. शासनाने त्वरित हस्तक्षेप करून सीसीआय नोंदणी सुरू करावी आणि शेतकऱ्यांचे थकीत पैसे त्यांच्या खात्यात जमा करावेत, अन्यथा शेतकरी मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडतील, असा इशारा प्रा. डॉ. गावंडे यांनी दिला आहे. .शेतकऱ्यांच्या संघर्षाकडे शासन दुर्लक्ष करू शकत नाही, जर लवकरच निर्णय न झाल्यास हा मुद्दा केवळ तालुक्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण राज्यभर गाजेल. त्यामुळे प्रशासनाने वेळीच पावले उचलून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, हीच मागणी आहे..सध्या सीसीआयची नोंदणी बंद असल्याने कापूस खरेदीवर थेट परिणाम झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाच्या पैशांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. शेतीसाठी लागणाऱ्या नव्या भांडवलाची कमतरता भासत असून पुढील हंगामासाठीही मोठ्या अडचणी येऊ शकतात. शासनाने तातडीने निर्णय घ्यावा व समस्या निकाली काढावी. - प्रा. डॉ. सुशील गावंडे .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
दर्यापूर - तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) अंतर्गत कापूस खरेदी होऊनही ३१ जानेवारीपासून शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत..शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे वेळेत मिळावेत, यासाठी दि. दर्यापूर तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री समितीचे विद्यमान संचालक प्रा. डॉ. सुशील गावंडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र, अद्याप कोणताच ठोस निर्णय झालेला नाही. .शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकवलेला कापूस विकला, पण त्यांना पैसे मिळत नाहीत, ही शोकांतिका आहे. शासनाने त्वरित हस्तक्षेप करून सीसीआय नोंदणी सुरू करावी आणि शेतकऱ्यांचे थकीत पैसे त्यांच्या खात्यात जमा करावेत, अन्यथा शेतकरी मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडतील, असा इशारा प्रा. डॉ. गावंडे यांनी दिला आहे. .शेतकऱ्यांच्या संघर्षाकडे शासन दुर्लक्ष करू शकत नाही, जर लवकरच निर्णय न झाल्यास हा मुद्दा केवळ तालुक्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण राज्यभर गाजेल. त्यामुळे प्रशासनाने वेळीच पावले उचलून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, हीच मागणी आहे..सध्या सीसीआयची नोंदणी बंद असल्याने कापूस खरेदीवर थेट परिणाम झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाच्या पैशांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. शेतीसाठी लागणाऱ्या नव्या भांडवलाची कमतरता भासत असून पुढील हंगामासाठीही मोठ्या अडचणी येऊ शकतात. शासनाने तातडीने निर्णय घ्यावा व समस्या निकाली काढावी. - प्रा. डॉ. सुशील गावंडे .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.