
कळमेश्वर (जि. नागपूर ) : तालुक्यातील 3 हजार 3 शेतकऱ्यांना खरीप हंगामाची नुकसानभरपाई म्हणून 13 कोटी सहा लाख रुपयांची मदत देण्यात आली. मात्र, योग्य नियोजन आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे 1 हजार 17 शेतकरी या योजनेतून वगळण्यात आले. या शेतकऱ्यांची नुकसानभरपाईची रक्कम रुपये 79 लाख शासनाने परत मागितली. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान परत गेले. शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यावर न्यायालयाच्या आदेशाने सरकारने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून दिली आहे.
शासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने तालुक्यातील सोनपूर येथील शेतकरी शेखर पडोळे, बाबा बापूराव धोटे(आदासा), रमेश आखरे भडांगी यांनी उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल केली. त्या याचिकेवर सुनावणीनंतर शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची रक्कम खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले. उच्च न्यायालयाने 24 सप्टेंबरपर्यंत शासनाला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. परंतु, शासनाने उत्तर दाखल करण्याआधीच तहसील कार्यालय कळमेश्वरला परत गेलेली रक्कम परत केली. परंतु, 24 तारखेला न्यायालयाची तारीख असल्याने शेतकऱ्यांच्यावतीने काम पाहणारे वकील ऍड. राहुल धांडे यांनी न्यायालयाला शेतकऱ्यांची रक्कम शासनाने परत केल्याची माहिती दिली. याप्रकरणी न्यायालयाने परत आलेली रक्कम शेतकऱ्यांना परत करण्याचे आदेश दिले.
सततच्या राज्य शासनाच्या शेतकऱ्यांप्रति चुकीच्या धोरणामुळे होत असलेला अन्याय बघता शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नरत असलेल्या आमदार सुनील केदार व न्यायालयाचे शेतकऱ्यांनी या प्रकरणी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.