नागपूर: माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाला झालेल्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झाले, तर तिघे गंभीर आहेत. हंसराज अहिर सुखरूप आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सीआरपीएफ जवानासह दोघांचा समावेश आहे.
वर्धा जिल्ह्यातील कांडळीजवळ आज (गुरुवार) सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. हंसराज अहिर हे चंद्रपूरहून नागपूरला जात होते. वर्ध्यातील जाम चौरस्त्याजवळ कांडळी नदी पार केल्यानंतर हा अपघात झाला. सुरक्षा वाहनाचा चालक गंभीर असल्याचे समजते. हा अपघात इतका भीषण होता की, ताफ्यातील अपघातग्रस्त गाडीचा चेंदामेंदा झाला आहे.
अपघातात विनोद झाडे (पोलिस) आणि फलजीभाई पटेल (सीआरपीएफ) जवान या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तीन जवान गंभीर जखमी झाले असून, त्यांना नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.