

Gadchiroli News
esakal
गडचिरोली: जिल्ह्याला भीषण उष्णतेच्या झळा बसू लागल्या आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिक पूर्णपणे हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असून, नागरिकांचे घराबाहेर पडणे टाळत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्याचे कमाल तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले जात आहे. किमान तापमानही २८ अंशांवर गेल्याने रात्रीही उकाडा कायम आहे. आर्द्रता केवळ १५ ते २० टक्क्यांवर आल्याने वातावरण कोरडे व रखरखीत झाले आहे. ग्रामीण व जंगलव्याप्त भागात तर उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे शहरात शीतपेयांची मागणी प्रचंड वाढली आहे.