

Yavatmal News
esakal
घाटंजी : शासनाच्या स्पष्ट आदेशानंतरही तालुक्यातील पांदण रस्त्यांची कामे सुरू न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कागदोपत्री योजना आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामधील दरी वाढत असून, त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
शेतात जाण्या-येण्यासाठी आवश्यक असलेले पांदण रस्ते विकसित करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांनी याबाबत मोठ्या घोषणा करीत कार्यपद्धती जाहीर केली. २४ डिसेंबर २०२५ रोजी शासन निर्णयाद्वारे समित्यांची रचना, जबाबदाऱ्या व कामकाजाची रूपरेषा निश्चित करण्यात आली.