
खापरखेडा : खापरखेडा जवळील वलनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने शेतात तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली असून, सोयाबीन, कपाशी आणि तुरीसारखी खरीप पिके पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. परिणामी अनेक शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करण्याची वेळ आली आहे.