
अकोला : राज्यात संचारबंदीचे कडक पालन व्हावे यावर शासनाने भर दिला आहे. संचारबंदीचे उल्लंघन केले म्हणून 57 हजार 517 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. क्वारंटाईन केले असतांनाही बाहेर फिरतांना आढळले म्हणून 572 लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे कायदा मोडणाऱ्यांवर आपत्तीच्या काळातच कारवाईचे सत्र सुरु असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी (ता. 20) येथे पत्रकार परिषदेत दिली.
कोरोना सद्यस्थितीबाबत जिल्ह्याचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी (ता. 20) आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की राज्यात सहा तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. त्यामुळे ते तुरुंग लॉकडाउन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार तुरुंगात बाहेरची कोणीही व्यक्ती आत जाणार नाही व आतली व्यक्ती बाहेर जाणार नाही. लॉकडाउन करण्यात आलेल्या तुरुंगांमध्ये औरंगाबाद, येरवाडा, ठाणे, ऑर्थररोड जेलसह इतर दोन तुरुंगांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय मानव संसाधन विकास माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलिस अधीक्षक अमोघ गावकर व इतर अधिकारी उपस्थित होते.
काय केले सत्रात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.