अमरावती : पालकमंत्र्यांचे खिसे गरम झाले असतील तर जनतेकडे लक्ष द्या’

पालकमंत्र्यांचे खिशे गरम झाले असतील तर आपल्या मतदार संघातील जनतेकडे लक्ष द्यावे
Vidarbha
Vidarbhasakal

तिवसा (जि. अमरावती) : माजी कृषिमंत्री व भाजप नेते डॉ.अनिल बोडे यांच्या नेतृत्वात तिवसा तहसील कार्यालयावर भाजपच्या वतीने किसान जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता दिवाळी आधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत यासह विविध मागण्या घेऊन शहराच्या राष्ट्रीय महामार्गावरून हा मोर्चा काढण्यात आला, तेव्हा माध्यमांशी बोलताना अनिल बोंडे यांनी पालकमंत्र्यांचे खिशे गरम झाले असतील तर आपल्या मतदार संघातील जनतेकडे लक्ष द्यावे अशी टीका यावेळी त्यांनी केली.

तिवसा तालुका हा पालक मंत्री यांचा मतदारसंघ असताना सुद्धा इथल्या शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली आहे,या भागातील फळबागेचे पंचनामे झाले नाहीत,अतिवृष्टी त्यामुळे खचलेल्या विहिरीचे सर्वेक्षण झाले नाही,पीएम किसान योजनेच्या सर्वेक्षण करणारी यंत्रणा कृषी विभागाने किंवा महसूल विभागाने राबवायची हा त्यांच्या पुढे प्रश्न आहे.

Vidarbha
बालक-पालक : खरेदीचा शुभमुहूर्त

घरकुला संदर्भात इथलं प्रशासन समाधानकारक उत्तर देऊ शकत नाही,पालक मंत्री जनता दरबार भरवत नाहीत, संजय गांधी,श्रावण बाळ योजनेचे पैसे मिळाले की नाही याची चिंता करत नाही,त्यामुळेच इथल्या शेतकऱ्यांच्या सामान्य लोकांच्या समस्या घेऊन आज आम्ही जन आक्रोश किसान मोर्चा च्या माध्यमातून तहसील कार्यालयाच्या दारात सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थित हा दरबार भरविला, किमान आता या मोर्चानंतर तरी पालकमंत्र्यांना थोडीशी तरी जाग येईल, जर का खिसे गरम झाले असतील तर लोकांकडे लक्ष द्यावे अशी टीका त्यांनी आक्रोश मोर्चा दरम्यान केली. पालकमंत्री शेतकरी व सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील यावेळी बोडे यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com